प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत 2 लाख महिलांना अर्थसहाय्य!

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमार्फत जिल्ह्यात २ लाख २० हजार मातांना अर्थसहाय्य देण्यात आले आहे. 

महिला आणि बाल विकास मंत्रालयमार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेत महिलांना हप्त्यांमध्ये ५ हजार रूपये दिले जातात. 

पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असल्यास तिला अतिरिक्त १ हजार रुपये म्हणजेच एकूण ६ हजार रुपये दिले जातात.

यासाठी अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन अर्ज करता येतो. 

ही रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.

याचा पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपये.

दुसरा हप्ता हा गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर २ हजार रुपये.

तर तिसरा हप्ता हा पाल्याच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी २ हजार रुपये दिला जातो.